By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: पाकिस्तान बिथरला; सीमेवरील अंदाधुंद गोळीबारात १५ जणांचा मृत्यू, एक जवान शहीद…  
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > पाकिस्तान बिथरला; सीमेवरील अंदाधुंद गोळीबारात १५ जणांचा मृत्यू, एक जवान शहीद…  
अहमदनगर

पाकिस्तान बिथरला; सीमेवरील अंदाधुंद गोळीबारात १५ जणांचा मृत्यू, एक जवान शहीद…  

Last updated: 2025/05/08 at 11:26 AM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

नवी दिल्ली : पहलगाम येथे (दि.२२) एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सैन्याकडून बदला घेण्यात आला आहे. बुधवारी ( दि.७ मे) पहाटे १.३० वाजताच्या सुमारास भारताने पाकिस्तान एअर स्ट्राइक केला. पहलगाममध्ये भारतीय महिलांच्या कपाळांवरील सिंदूर पुसणाऱ्या आंतकवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले आहे. पण या हल्ल्यानंतर आता पाकिस्तान बिथरला असून पाकिस्तान सैन्याकडून भारतीय सीमेवर वारंवार अंदाधुंद गोळीबार करण्यात येत आहे. या गोळीबारात आतापर्यंत १५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असून एक जवानही शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. दिनेश कुमार शर्मा असे शहीद झालेल्या भारतीय सैन्याच्या जवानाचे नाव आहे. बुधवारी भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करत पाकड्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. भारताच्या या हल्ल्यामुळे पाकिस्तान मात्र बिथरला आहे. कारण पाकिस्तानकडून गेल्या काही तासांमध्ये जोरदार हल्ले करण्यात येत आहे. पण भारतही पाकच्या या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. पुँछ राजौरी आणइ उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला आणि कुपवाडा या भागात वारंवार गोळीबार करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत १५ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ज्या भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. तेथील नागरिकांना विशेषतः महिलांना आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. तर पूँछ येथील भारतीय सीमेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात जवान दिनेश कुमार शर्मा हे गंभीर जखमी झाले होते. ज्यानंतर त्यांना तत्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ज्यानंतर डॉक्टरांनी दिनेश कुमार यांना वाचविण्याचा पूर्णतः प्रयत्न केला. परंतु डॉक्टरांना दिनेश यांना वाचवण्यात अपयश आले. ज्यानंतर लान्स नायक दिनेश कुमार शर्मा शहीद झाल्याची माहिती भारतीय सैन्याकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली. जवान दिनेश कुमार शर्मा हे हरियाणाचे होते. परंतु पाकिस्तानकडून सतत होणाऱ्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना त्यांना वीरमरण आले.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad1
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article अहिल्यानगरमध्ये चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय….
Next Article अहिल्यानगरमध्ये सामाईक विहिरीचे पाणी पिण्यासाठी घेतले म्हणून पती-पत्नीला जबर मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?