TIMES OF AHMEDNAGAR
भारत आणि इंग्लंड संघातील मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाला भारतीय फिरकीपटूंनी २१८ धावांवर गुंडाळले. यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या दिवसखेर १ बाद १३५ धावा केल्या असून ८३ धावांनी पिछाडीवर आहे.
भारताच्या क्रिकेट विरांसमोर इंग्लंडची टीम हतबल.
कर्णधार रोहित शर्मा ५२ धावांवर नाबाद असून शुबमन गिल २६ धावांवर नाबाद आहे. दोघांमध्ये ३१ धावांची भागीदारी झाली आहे. भारतीय संघाला एकमेव धक्का यशस्वी जैस्वालच्या रूपाने बसला. तो ५८ चेंडूत ५७ धावा करून बाद झाला होता. त्याला शोएब बशीरने यष्टिरक्षक बेन फॉक्सकरवी यष्टिचित केले. इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर झाला. कुलदीप यादवने पाच विकेट घेतले. त्याच वेळी रविचंद्रन अश्विनने १०० वा कसोटी खेळताना चार विकेट घेतले. इंग्लंडकडून झॅक क्रॉऊलीने सर्वाधिक ७९ धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाला. इंग्लंडच्या सर्व १० विकेट्स भारतीय क्रिकेट पटूनी घेतल्या आहेत.
स्त्रोत. सोशल मिडिया.