भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल माकड,बेवडा असा उल्लेख.
महाराष्ट्रात मागील अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी राज्यभर साखळी उपोषणे करण्यात आली.राज्य शासनाच्या वतीने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलने व उपोषणे स्थगित करण्यात आले.काही ठिकाणी संतप्त जमावाने काही नेत्यांच्या घाराची तोडफोड केली,काहींची घरे जाळण्यात आली.आरक्षण मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला होता.त्यातच मराठा समाजाला ओबिसीतून आरक्षण द्यावे हि मागणी देखील जोर घेत असतांना ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणात उडी घेत ओबीसीमधून कोणत्याही प्रकारचे आरक्षण कमी केले जाऊ नये यासाठी यल्गार पुकारत ओबीसी समाजाला आंदोलने करण्याचे आवाहन केले.
जरांगे बेवडा,त्याच्या किडन्या किडल्यात भुजबळांचे आक्रमण.
हा जरांगे आमची लायकी काढतो,काही बोलतो,काही बोलतो.मला बोलतो तो येवल्याचा काय ? येडपट आहे म्हणतोय,येवल्याचा येडपट,काय सांगायच याला,एक म्हण हाय,आधीच मरकट,त्याच्यामध्ये मध्यप्याला,आधीच माकड त्याच्यात बेवडा प्याला.काही बोलतोय,अरे आमची लायकी तू काय पाहतोस. असा थेट सवाल करत भुजबळांनी मनोज जरांगेंवर हल्लाबोल केला आहे. २७ टक्के ते जरांगे सांगतात छगन भुजबळ एकटा खातो,एकटा खातो, ते काय लाडू पेढेत का ? एकटा खायला,एकटा खातो,एकटा खातो, तू खातोय न सासरच्या घरच्या भाकरी,खा तिकडेच. मनोज जरांगेंवर टीका करतांना मनोज जरांगे बेवडा आहे दारू पिऊन त्याच्या किडन्या किडल्या आहेत असा हल्लाबोल भुजबळांनी जरांगेंवर केला आहे. दारू पिऊन मनोज जरांगेच्या किडन्या किडल्यात. ओबीसींना जे विरोध करतात त्यांचा निवडणुकीत कार्यक्रम करा. साखळी उपोषण करा,मोर्चे काढा,कॅण्डल मार्च काढा असाही सल्ला भुजबळांचा ओबीसी नेत्यांना दिला आहे.
भुजबळ खास येडपट.
मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांचे शाब्दिक युद्ध थांबायचे नावच घेत नाही. दोन्ही बाजूने एकमेकांवर अत्यंत खालच्या पातळीवर शाब्दिक हल्ले चडवले जात आहे. त्यातच छगन भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर माकड आणि दारुड्या म्हणत शाब्दिक आक्रमण केले आहे. दोन्ही गटाचे वाद मिटविण्यासाठी गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली होती,दोघेही एकमेकांवर टीका करनार नाहीत असे ठरले हेते. मात्र महाजनांच्या या मध्यास्तीला यश आलेले नाही. छगन भुजबळांनी जरांगेंना सासरचे तुकडे तोडतोस म्हणत डिवचले होते. भुजबळांनी आता थेट दारुड्या म्हणत त्यांच्यावर शाब्दिक आक्रमण केले आहे. यावरउत्तर देतांना मनोज जरांगे म्हणाले कि माझी नार्कोटेस्ट करा, माझ्या जीवनात जन्म घेतल्यापासून आजपर्यंत एकदातरी दारूला हात लावला असल्यास मी जिवंत समाधी घेईल,नाहीतर भुजबळांनी समाधी घ्यावी. जनतेसाठी लढत असल्यामुळे माझ्या शरीराची अशी अवस्था झाली आहे. तुझ्यासारख लोकांच रक्त पिऊन शरीर वाढलेलं नाही अस म्हणत जरांगेंनी भुजबळांना टोला लगावला आहे.पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते येडपट आहे अस देखील जरांगे म्हणले आहे. माकड काय करतो हे रावणाला विचार,तुमची सुद्धा लंका आम्ही जाळू असा थेट इशारा जरांगेंनी भूजबळांना दिला आहे.
आपआपसात तेढ निर्माण करू नये: गिरीश महाजन.
जरांगे आणि भुजबळ यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवर मंत्री गिरीश महाजन म्हणााले, मी दोन्ही नेत्यांना विनंती करणार आहे.आपआपसात तेढ निर्माण होईल असे कुणी बोलू नये. विषय दोन्ही कडून संपले पाहिजे संयम ठेवण्याची भूमिका घ्यावी दोघांनी घेतली पाहिजे.