By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: जिल्ह्यात नाहीच मात्र खात्यात देखील अधीक्षकांचे चालत नाही,तीन महिने ओलांडले मात्र प्रशासन झोपेत : असद शेख
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > जिल्ह्यात नाहीच मात्र खात्यात देखील अधीक्षकांचे चालत नाही,तीन महिने ओलांडले मात्र प्रशासन झोपेत : असद शेख
अहमदनगर

जिल्ह्यात नाहीच मात्र खात्यात देखील अधीक्षकांचे चालत नाही,तीन महिने ओलांडले मात्र प्रशासन झोपेत : असद शेख

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MAHARASHTRA POLICE | AHMEDNAGAR | AHMEDNAGAR POLICE | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE | ALLEGATIONS OF ASAD SHEIKH | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.|

Last updated: 2024/02/05 at 1:11 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

भाग – ६ 

अहमदनगर जिल्ह्यात गुंडांची दहशत कायम आहेच त्यात शंका व्यक्त करण्याचे एकही कारण नाही. मात्र पोलिसांच्या भूमिकेवर देखील वारंवार संशय घेतला जात आहे. गुन्हे घडतात पोलीस गुन्हेगारांना अटक करतात. मात्र गुन्हेगारांचा व त्या गुन्ह्यांचा पूर्णपणे तपास होत नाही. असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर  यांनी पत्रकार परिषदेत केला होता. गुन्हेगारांना कोणतीही जात किंवा धर्म नसतो हे जरी खरे असले तरी त्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळनाऱ्या पोलिसांना धर्म असतो.

तो धर्म म्हणजे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत.

 

कारभार बेकायदेशीर ? 

अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ,अहमदनगर या प्रशासकीय इमारतीमध्ये स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आहे. त्याच इमारतीमध्ये सायबर पोलीस स्टेशनची शाखा आहे.पो.कॉ. प्रशांत राठोड व पो.कॉ.रवींद्र कर्डिले यांना गुन्ह्याच्या तपास करणेकामी सायबर पो.स्टे येथे ३ महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात ०९ मे २०२३ रोजी सलग्न नेमणूक देण्यात आली होती.तसे पत्र पोलीस उपाधीक्षक ,(मुख्यालय) कमलाकर जाधव यांच्या सहीने संबंधितांना पोहोच करण्यात आले होते. नमूद पत्रात नमूद पोलीस अंमलदार यांना कार्यमुक्त केले दिनांकापासून तीन महिने कालावधी पूर्ण झालेनंतर प्रभारी अधिकारी सायबर पो.स्टे यांनी कालावधी पूर्ण झालेनंतर तात्काळ पूर्वीचे ठिकाणी कार्यमुक्त करण्यात यावे तसे या कार्यालयास अवगत करावे असे नमूद करण्यात आले आहे. मात्र अद्यापही या कर्मचाऱ्यांना संबंधित विभागातून कार्यमुक्त करण्यात आले नाही. पोलीस अधिकारांचा बेकायदेशीर वापर करत आहेत स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असतांना रवींद्र कर्डिले यांनी माझ्याकडे लाचेची मागणी केली होती. त्यांच्यावर भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदविण्यात आला होता. ज्या शाखेत कार्यरत असतांना रवींद्र कर्डिले यांच्यावर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल आहे त्याच शाखेत कर्डिले हे कार्यरत असल्याचे तक्रारदार असद शेख यांनी म्हंटले आहे.

 

 

 

 

 

अधीक्षकांचे जिल्ह्यात नाहीच,खात्यातही चालत नाही. ?

जिल्ह्यात मागील अनेक महिन्यांपासून अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. जिल्ह्याभरात पोलीस अधीक्षकांची खमकी भूमिका दिसत नसल्याने नागरिक नाराजीच्या भावनेतून अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.या प्रकारावर तक्रारदार असद शेख यांनी मत मांडतांना भाष्य केले कि अधीक्षकांचे त्यांच्या पोलीस खात्यातच कोणी ऐकत नाही.कारण रवींद्र कर्डिले यांना मे २०२३ मध्ये सायबर.पो.स्टे ला नियुक्ती देण्यात आली होती. आज त्या गोष्टीला ९ महिने उलटत आले आहेत. तरी देखील कर्डिले यांना कार्यमुक्त केले गेले नाही.म्हणून अधीक्षकांचे खात्यात देखील चालत नसल्याचे शेख यांनी टाइम्स ऑफ अहमदनगरशी बोलतांना सांगितले

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article लष्कराच्या बनावट गणवेशाची विक्री करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या.
Next Article चॉकलेट देण्याचा बहाणा करून,बाथरूममध्ये नेऊन नर्सरी स्कूल मधील चार वर्षीय मुलीवर अत्याचार……
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?