TIMES OF AHMEDNAGAR
अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीला वचक नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वसाधारण व्यक्ती सुरक्षित नाहीच,मात्र वकील देखील सुरक्षित नसल्याचे चित्र आज जिल्हात आहे.

कट रचून वकिलाचा खून.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका येथील न्यायालयात कामकाज पाहणारे वकील ॲड. राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲड. मनीषा राजाराम आढाव हे काही दिवसांपूर्हेवी बेपत्ता होते. राहुरी तालूक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती येथे ॲड. राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲड. मनीषा राजाराम आढाव राहत होते. ॲड. राजाराम आढाव हे गुरुवारी दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी दुपार पर्यंत राहुरी येथील न्यायालयात त्यांचे कामकाज करत होते. त्यानंतर दुपारी दोन वाजे दरम्यान ते अहमदनगर येथे गेले. त्यानंतर त्यांनी एका पक्षकाराला पाठवून त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव यांना बोलावून घेतले. अशी माहिती मिळाली होती. तेव्हापासून आढाव हे दोघे पती पत्नी बेपत्ता होते. आज पहाटे दोन वाजे ॲड. राजाराम आढाव यांची फियस्टा कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एम एच १७ ए इ २३९० ही गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात बेवारस मिळून आली. त्या गाडीची तपासणी केली असता गाडीत एक हातमोजा, दोर व एक बूट आढळून आले होते. तपासा दरम्यान पोलिस पथकाला आज दुपारी १२ वाजे दरम्यान आढाव यांची दुचाकी क्र. एम एच १७ ए डब्लू ३२०७ ही गाडी राहुरी येथील न्यायालयाच्या मागील परिसरात बेवारस मिळून आली. तसेच आढाव यांचे एटीएम कार्ड राहुरी येथील आयसीआयसीआय बँके समोर बेवारस मिळून आले होते.

आरोपींनी खून करून मृतदेह टाकला विहिरीत.
ॲड. राजाराम आढाव व ॲड. मनीषा आढाव यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात असताना दोघांचे मृतदेह एका विहिरीत आढळल्यामुळे राहुरीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. उंबरे येथील अमरधाम जवळील विहिरीमध्ये दोन्ही मृतदेहांना दगड बांधून विहिरीत टाकल्याचे निदर्शनास आले आहे. तर ॲड.राजाराम आढाव यांना गोळ्या घालून ठार मारले असून मनीषा आढाव यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा खून भाऊबंदकीच्या वादातून झाल्याची चर्चा सध्या जोरात असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने काही तासातच या प्रकरणाचा उलगडा केला आहे. पोलिसांनी काही संशयित लोकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून या खुना बाबत अजूनही काही माहिती मिळवण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत.
फोर्ड कार न्यायालाच्या परिसरात,गाडीत गाडीत एक हातमोजा, दोर व एक बूट आढळून आले.
राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ॲड.राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी ॲड.मनीषा आढाव हे बेपत्ता झाले होते. त्यांची फोर्ड कार राहुरी कोर्ट परिसरामध्ये संशयितरित्या आढळून आली होती. या पती-पत्नीचे अपहरण झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांना होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गतिमान तपास करत काही आरोपींना ताब्यात घेतल्याचे समजते. आरोपींनी या वकील दाम्पत्याची हत्या करून मृतदेह राहुरी तालुक्यातील उंबरे येथील स्मशानभुमी जवळील विहिरीत टाकून दिला असल्याची कबुली दिली असल्याची माहिती आहे. परंतु आरोपींनी खून कोणत्या कारणातून केला हे समजू शकले नाही.