By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading:  पहलगाम दहशतवादी हल्ला ; महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश पुण्यातील कुटुंबावर धर्म विचारून गोलीबाराचा हल्ला , दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र >  पहलगाम दहशतवादी हल्ला ; महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश पुण्यातील कुटुंबावर धर्म विचारून गोलीबाराचा हल्ला , दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू….
महाराष्ट्र

 पहलगाम दहशतवादी हल्ला ; महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश पुण्यातील कुटुंबावर धर्म विचारून गोलीबाराचा हल्ला , दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू….

Last updated: 2025/04/23 at 3:17 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

 जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (दि.२२ एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. मृतांपैकी दोघे पुण्यातील रहिवासी आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात काही लोक जखमी झाल्याचीही माहिती आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहलगाम दहशतवादी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये दोन पुण्याचे, तीन डोंबिवलीचे आणि एक पनवेलचा रहिवासी आहे. पुण्यातील मृतांची ओळख संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गंबोटे अशी झाली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील तीन मृत पर्यटकांची ओळख पटली आहे. त्यांची नावे संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी अशी आहेत. महाराष्ट्रातील सर्व पर्यटक शनिवारी (दि.१९ एप्रिल ) त्यांच्या कुटुंबासह पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते. डोंबिवलीतील ठाकूरवाडी परिसरातील रहिवासी अतुल मोने, डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदान परिसरातील रहिवासी हेमंत जोशी आणि सुभाष रोड परिसरातील रहिवासी संजय लेले हे देखील त्यांच्या कुटुंबियांसोबत गेले होते. याशिवाय दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या महाराष्तीट्लरातील पर्यटकांमध्ये मुंबईतील बालचंद्रन आणि शोभित पटेल यांची नावे समोर आली आहेत. जखमींमध्ये आसावरी जगदाळेचा सुद्धा समावेश आहे. आसावरी यांनी अत्यंत थरकाप उडवणारा प्रसंग कथन केला आहे. आसावरी जगदाळे यांच्या वडिलांना सुद्धा गोळी लागली असून त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना थरकाप उडवणारा प्रसंग सांगितला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या की आम्हाला प्रचंड भीती वाटत आहे, कुठं काय होईल याची भीती आम्हाला वाटत आहे. सगळीकडे आर्मी असते, नाका नाक्यावर चेकपोस्टस् आहेत, पण जिथं गरज होती तिथं मदतीसाठी आम्हाला आवाज द्यायला कोणीच नव्हतं. ना पोलिस, ना मिलिटरी होती, त्यांनी रेस्क्यू केलं. ते कर्तव्य आम्ही आमच्यांना गोळ्या लागताना पाहिलं. 

अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली - Marathi News | Pahalgam Terror Attack: Major terror attack in Jammu and ...(संग्रहित दृश्य.)

दोन धर्मातील काही वाईट प्रवृत्तींमुळे चांगल्या लोकांना फेस करावं लागतं

असावरी यांनी सांगितलं की तुम्ही बसून ऐकत आहात पण आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय आम्ही काय पाहिलं आमचं आम्हाला माहिती आहे. त्या म्हणाल्या की, मला एकाच गोष्टीचं प्रचंड वाईट वाटतंय की हिंदू मुस्लीम वादामध्ये जी सामान्य लोक एकमेकांना हिंदू मुस्लीम भाऊ बहिण अशा नात्याने राहतात किंवा घट्ट मैत्री असते. या दोन धर्मातील काही वाईट प्रवृत्तींमुळे चांगल्या लोकांना फेस करावं लागतं. या वादामुळे सामान्य लोकांनी का फेस करावं? आम्ही पैसे देऊन फिरायला आलो होतो, अशा ठिकाणी आम्ही येऊन थांबलो आमच्या हातात काहीच नाही. आम्हाला लवकरात लवकर सरकारकडे पोहोचण्यात यावं ही आमची सरकारकडे मागणी आहे. राजकारणाशी आमच्या भावनांशी खेळू नका. दरम्यान,२०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर खोऱ्यातील हा सर्वात मोठा हल्ला आहे. पहलगाम शहरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेले बैसरन हे घनदाट पाइन जंगले आणि पर्वतांनी वेढलेले एक विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे आणि देश आणि जगभरातील पर्यटकांमध्ये ते एक आवडते ठिकाण आहे.  अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळी सशस्त्र अतिरेकी आले आणि त्यांनी रेस्टॉरंट्समध्ये फिरणाऱ्या, खेचरांवर स्वार होणाऱ्या आणि पिकनिक करणाऱ्या पर्यटकांवर गोळीबार केला. पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची आघाडी संघटना, रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. काश्मीर खोऱ्यात झालेल्या या हल्ल्यात २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने झोपेत असलेल्या बायकोच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार ; जीवे मारण्याचा प्रयत्न…
Next Article अनैसर्गिक संबंधांसाठी बळजबरी करणाऱ्याची २१ वर्षीय तरुणाकडून निर्घृणपणे हत्या, शीर अन् धड… वेगळं
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?