By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: निवडणुकांवर सर्वोच्च निकाल ; अखेर महानगरपालिका निवडणुकींचा मुहूर्त ठरला…
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > निवडणुकांवर सर्वोच्च निकाल ; अखेर महानगरपालिका निवडणुकींचा मुहूर्त ठरला…
महाराष्ट्र

निवडणुकांवर सर्वोच्च निकाल ; अखेर महानगरपालिका निवडणुकींचा मुहूर्त ठरला…

Last updated: 2025/05/06 at 4:44 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

नवी दिल्ली : गेल्या चार वर्षांपासून कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या आणि विविध कारणांमुळे स्थगित झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसंदर्भात महत्त्वाचा आदेश दिला आहे. पुढील चार महिन्यांत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात आणि याबाबतची अधिसूचना येत्या चार आठवड्यात काढावी. असा सर्वोच्च आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याच्या आत महाराष्ट्रात पुन्हा गुलाल उधळला जाणार आहे. तर २०२२ पूर्वीच्या ओबीसी आरक्षणाच्या निकषांनुसारच या निवडणुका घेण्यात याव्यात असेही कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षण प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज मंगळवारी (दि.६ मे) सुनावणी पार पडली आहे. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की देशात आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखे झाले आहे. जे लोक त्यात चढले आहेत ते दुसऱ्यांना आत येऊ द्यायला तयार नाहीत. तर याचिकाकर्त्यांतर्फे इंदिरा जयसिंह यांनी सुप्रीम कोर्टाकडे महाराष्ट्रात पंचायत निवडणुका घेण्याची मागणी केली. इंदिरा जयसिंह म्हणाल्या की निवडून आलेल्या स्थानिक संस्था अस्तित्वात नाहीत. त्यांच्या जागी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Supreme Court : सुप्रीम कोर्ट का बड़ा फैसला(संग्रहित दृश्य.)

सुप्रीम कोर्टाचा निवडणुकींसंदर्भात आदेश…

याचिकाकर्त्या इंदिरा जयसिंह यांच्या या मतानंतर न्या. सूर्यकांत म्हणाले की फक्त काही विशिष्ट वर्गांनाच आरक्षण का मिळावे? सामाजिक आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मागासलेल्या इतर लोकांना आरक्षण का मिळू नये? यावर विचार करणे ही राज्यांची जबाबदारी आहे. असे न्यायमूर्तींनी म्हटले. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात पुढील चार आठवड्यात अधिसूचना काढण्यात यावी त्यानंतर पुढील चार महिन्यात म्हणजेच सप्टेंबरपर्यंत निवडणुका घेऊन त्यांचे निकालही लावण्यात यावे.    १९९४ ते २०२२ पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती. त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्यात यावी. राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यकाळात कार्यवाही करावी. सुप्रीम कोर्टाने या सुनावणीवेळी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करत म्हटले की अशा पद्धतीने लोकशाही थांबवण्याचा किंवा लोकशाहीची गळचेपी करता येत नाही. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून निवडणुका घेतलेल्या नाहीत. तरी सुद्धा पाच वर्षांपर्यंत प्रशासकाच्या आधारे नगरपालिकांचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry1
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article आठ वर्षाच्या मुलासमोरच बायकोचा गळा दाबून केला खून , मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाताना चौकात पोलिसांनी पकडलं…
Next Article निवडणुकीच्या आदेशाचे शिवसेनेने केले स्वागत ; किरण काळेंच्या नेतृत्वात आता युवा पिढीला नवी संधी मिळणार !
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?