By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल संजय राउत यांनी व्यक्त केले मोठे विधान.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल संजय राउत यांनी व्यक्त केले मोठे विधान.
महाराष्ट्र

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल संजय राउत यांनी व्यक्त केले मोठे विधान.

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | RAJ THACKERAY | UDDHAV THACKERAY | SANJAY RAUT | AMIT SHAH | LOK SABHA ELECTION | WILL RAJ THACKERAY AND UDDHAV THACKERAY GET TOGETHER ? | SANJAY RAUT SPOKE CLEARLY | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/03/06 at 7:42 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का ?

लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. अशातच भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महायुतीच्या जागावाटपाचंही ठरलं आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे विरोधकांनी म्हणजेच महाविकास आघाडीनेही कंबर कसली आहे. राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही. मात्र ते महायुतीबाबत जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का ? या प्रश्नाचं उत्तर दिले आहे.राज ठाकरेंनी जेव्हापासून शिवसेना सोडली आहे तेव्हापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे अशी भावना मराठी माणसांच्या  मनात आहे. अशात खासदार संजय राऊत यांचे राज ठाकरेंशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्याच अनुषंगाने संजय राऊत यांना जेव्हा विचारण्यात आलं की सध्या ज्या प्रकारचं राजकारण सुरु आहे ते पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का ? त्यावर संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे का? संजय राऊत म्हणाले, "अनेक दगडांवर पाय ठेऊन..." | Sanjay Raut comment on speculations of Raj Thackeray Uddhav Thackeray allianceस्त्रोत.सोशल मिडिया

महाराष्ट्र आणि मराठी यांच्यात फूट असता कामा नये.

राज ठाकरेंनी त्यांचा मार्ग त्यांनीच निवडला. राज ठाकरेंना कुणीही जा सांगितलं नाही. एखाद्या घरात चार मुलं असतील तर ती त्यांच्या मार्गाने जातात. कुणी आई वडिलांना सोडून अमेरिकेला जातो. कुणी आणखी काही भूमिका घेतात. समाजात या गोष्टी घडतात. राज ठाकरे हे माझे अजूनही मित्र आहेत. महाराष्ट्र, मराठी यांच्यात फूट असता कामा नये हे तर माझ्यासारख्या माणसाला वाटणारच. एखादा मार्ग एखाद्या सज्ञान व्यक्तीने निवडला आहे. याचा अर्थ त्याला आपलं भवितव्य कळतं. वेगळे जरी झालो तरीही कटुता असता कामा नये असं आम्ही मानतो आणि ती कटुता आमच्यात नाही. राजकीय मार्ग वेगळे असू शकतात. एकाच घरात चार पक्षाचे लोक आम्ही पाहिले आहेत. आपणही पाहतो. इसापनिती या यु टूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी हे उत्तर दिले आहे.

उपचुनाव में भाई उद्धव के साथ क्यों खड़े हुए राज ठाकरे? पढ़ें Inside Story - andheri east by election uddhav thackeray support raj thackeray bjp inside story ntc - AajTakस्त्रोत. सोशल मिडिया 

आम्ही लढत आहोत. 

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का ? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, ती वेळ आता निघून गेली. राज ठाकरेंनी पक्ष स्थापन करुन २५ वर्षे झाली. बाळासाहेब असताना वाटायचं सगळ्यांना की जे काही झाले  ते बरोबर झाले  नाही. पण आत्मपरीक्षण केलं त्यांच्या लोकांनी तर त्यांनी काय मिळवलं ? शिवसेनेचे तुकडे होऊनही आहे तिथेच आहेत. आजही आमचा पक्ष कुणाच्या तरी ताब्यात दिला गेला आहे. पण आम्ही आहोत ना.. आम्ही लढत आहोत. आम्ही पक्ष उभा करत आहोत, अविश्रांत मेहनत घेत आहोत. निवडणुका घेण्याची हिंमत दाखवा हे आम्ही सांगत आहोत. राज ठाकरेंना काय राजकीय फायदा झाला ? तर काही नाही. त्यांनी आता आत्मचिंतन केलं पाहिजे. राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं ही भावना मराठी माणसाच्या मनात नक्कीच आहे. महाराष्ट्राच्या कुंडलीत जे आहे ते घडेल.

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीसांचीच भाषा बोलतात,मनोज जरांगे म्हणाले सरकारचा करेक्ट कार्यक्रम …….
Next Article एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्त्या, आणि चिट्ठीत लिहिले की……
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?