लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाची सध्या चहुबाजूने चर्चा सुरू आहे.छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे. त्यामुळे विकी कौशलच्या कामाचं खुप कौतुक होत आहे. पण दुसऱ्याबाजूला छावा चित्रपटानंतर सोशल मीडियावर अनेक वाद-विवाद निर्माण झाले आहेत. याच वादाविषयी अभिनेते शरद पोंक्षे यांनी परखड मत मांडले आहे. शरद पोंक्षे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये शरद पोंक्षे म्हणाले,नमस्कार छावा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आणि सगळा हिंदू समाज, छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर नितांत प्रेम करणारे सगळे हिंदू अचानक एकवटले आहेत. हिंदूंना एक होण्यासाठी काहीतरी कारण लागतं. आपण सगळे एकवटलो, छावा चित्रपट खूप चालायला लागला आणि चित्रपटावर वाद-विवाद सुरू झाला. मग वंशजांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. दोन्हीकडून वाद प्रतिवाद सुरू झाले आहेत. मारामारी सुरू झाली,भांडणं सुरू झाली, पण या सगळ्या भानगडीमध्ये एक गोष्ट राहूनच गेली. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार करून जे हाल केलेले होते. म्हणजे क्रूरतेचं शेवटचं टोक गाठलं तो औरंगजेब मात्र बाजूलाच राहिला.
(संग्रहित दृश्य.)
हिंदू-हिंदूमध्ये आग पेटली आहे…..
शरद पोंक्षे म्हणाले की, छावा सिनेमा बघितल्यानंतर जसं सध्या काही घडलं तर एखाद्या नेत्याच्या फोटोवर चप्पला वगैरे मारतात, थुंकतात, असे प्रकार घडतात. खरंतर औरंगजेबाच्या प्रतिमेवरती चपला मारायला हव्या होत्या. त्याचे पुतळे ठिकठिकाणी हिंदूस्थानमध्ये जाळले जात आहे. असं चित्र दिसायला हवं होतं. दिसलं काय ? मराठा विरोध ब्राह्मण समाज म्हणणारे, आमचे पूर्वज असे नव्हते. तुमच्या ब्राह्मणांनी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मारलं आहे. मग ब्राह्मण म्हणणार, आमच्याकडे दोन-चार होते. हिंदू मराठ्यांनी छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांचं नुकसान केलं. ते जास्त गद्दार होते. मग मराठे म्हणणार, तुम्हीच सत्यानाश केला आहे. नंतर ब्राह्मण म्हणणार, तुम्हीच सत्यानाश केला. या सगळ्या भानगडीत एक विसरून जातात औरंगजेब बाजूलाच राहतोय औरंगजेबबद्दल राग, द्वेष नसानसात मिसळायला हवा होता. औरंगजेबाच्या विरोधात जी आग पेटायला हवी होती ती विझली. आग कोणामध्ये पेटली ब्राह्मण आणि मराठ्यांमध्ये, म्हणजेच हिंदू-हिंदूमध्ये आग पेटली आहे . हाच हिंदू जातीला लागलेला कलंक आहे. आपण कधी विचार करणार आहोत या सगळ्याचा, असा शरद पोंक्षे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.